सध्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. शेतजमिनी खरडून गेल्या, उभे पीक सडले, वाहून गेले. गावेच्या गावे पुराखाली बुडाली. पूरग्रस्तांना खायला अन्न-पाणी नाही, शेतकऱ्याच्या तोंडचा घास ऐन दिवाळीत हिरावला गेला आहे.
या भयावह परिस्थितीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. शिवश्री मनोज आखरे यांनी राज्यभरात आंदोलनाचे आदेश दिले होते. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या घरा समोर संबळ, टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य आंदोलन करण्यात आले.आमदार संचेती साहेबांचे प्रतिनिधी श्री. गावंडे व उपविभागीय अधिकारी श्री. संतोष शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या :
- (तत्काळ शेतकरी कर्जमाफी जाहीर करावी)
- (पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी)
- (पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी)
- (ओला दुष्काळ जाहीर करावा)
- (सोयाबीन व इतर पिकांवरील रोगांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी)
या आंदोलनाला उपस्थित होते :
प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील, जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील, जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे, जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर, मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे, नांदुरा तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार, मलकापूर तालुका उपाध्यक्ष गणेश सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष माधव रत्नपारखी, बेलाड शाखाध्यक्ष गजानन संबारे, डॉ. हनुमान भगत, सुधाकर राजस, रवींद्र वनारे, श्रीकृष्ण मनस्कार, सुनील केणे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते
0 Comments